ब्राह्मणांनीच ५००० हजार वर्ष आमच्यावर अन्याय केला


" ब्राह्मणांनीच ५००० हजार वर्ष आमच्यावर अन्याय केला ! "

मला कळत नाही तीन, साडे तीन टक्केवाले ब्राह्मण सुपरमॅन होते की काय ?
मनुस्मृतीप्रमाणे सुरूवातीला जे 4 वर्ण होते... ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र... त्यातल्या शूद्रांवर जर फक्त ब्राह्मणांनीच अन्याय केला... साडे तीनटक्के वाले लोक...
तेव्हा बाकीचे दोन वर्ण काय शूद्रांना सहानुभूती देत होते का ?
तेव्हा हे बाकीचे 2 वर्ण ब्राह्मण वर्णने केलेल्या सो कॉल्ड अन्यायाचा तोंडाला काळे फडके बांधून निषेध करत होते का ? कि चळवळ उभारत होते ?
नंतरच्या काळात पोटजाती निर्माण झाल्यावर त्यांना पण शूद्र म्हणून हिणवले जाऊ लागले त्यांच्याबरोबर रोटीबेटीचे व्यवहार कोणी बंद केले? स्वतःच्या वर्णाच्या क्षत्रिय,वॆश्य लोकांनीच ना? कारण ते सत्तेत अथवा तिच्या जवळ आल्याने स्वतः ला उच्च वर्णीय म्हणून घेऊ लागले होते.
दलित-बहुजन-ओबीसी समाजाच्या लोकांच्या मनात आज जाहीर भाषणांतून, लेखांतून हेच ठासवलं जातंय कि तुमच्यावर सगळा काय तो अन्याय ब्राह्मणांनीच केला.
एकदा नुसता लॉजिकल विचार करून पहा.
असं कसं शक्य आहे ?
पूर्वी भारतात बहुसंख्यंने ग्राम व्यवस्था होती समजा गावात १०० घरे आहेत त्यातील एखादं - दुसरे ब्राम्हणाचे, २५ घरे
स्वतः ला उच्चवर्णीय समजणाऱ्याची, दलितांची १०/२० घरे व उरलेली बहुजनसमाजातील असंघटीत बलुतेदार किंवा अठरा पगड जातीची असत. अशा परस्थितीत मोठया समाजाचा पाठिंबा असल्याशिवाय पोटार्थी भट लोक इतरांचे शोषण कसे करतील? त्यांना राज्यसत्तेचा पाठिंबा असे अन् सत्तेत कोण होते सांगण्याची गरज नाही.जगात सगळीकडे आजतागायत बुध्दिनिष्ठ समाज इतरांच्यावर हुकूमत गाजवतच आला आहे व पुढे पण गाजवत राहिल. आपल्या इथे ते काम ब्राम्हण करत आले ते आजतागायत राजसत्तेच्या जवळ राहण्यामुळेच !
राजसत्तेने धर्मांतर केल्याने हिंदू धर्माचे अस्तित्व धोक्यात आले होते भारतवर्ष बुध्दमय झाले होते.( सम्राट अशोक व नंतरचा काल ) कालांतराने सत्ताबदलामुळे पुन्हा हिंदू धर्माची भरभराट झाली. याचाच अर्थ कुठल्याही राजसत्तेच्या हातात असीम ताकद होती पण तिने तिचा वापर जातपात भेदभाव मिटवण्यासाठी केला नाही.
छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधानात पण सात ब्राम्हण होते.नंतरच्या काळात तर सर्व कारभारच त्यांच्या हातात गेला ज्याला आपण पेशवाई म्हणतो. ब्राम्हण तिथपर्यंत पोहचले. स्वतःच्या हुशारीने ! आता हे वाचून कुणी मूर्ख असाही निष्कर्ष काढेल की छत्रपतींना हिंदवी स्वराज्याच्या ऎवजी ब्राम्हणराज आणायचा होता.)
अन् आपण शहाणे होण्याच्या ऎवजी त्यांना शिव्या देण्यात धन्यता मानू लागलो. थोडक्यात बळी तो कान पिळी!
आजच्या काळातील उदाहरण घ्या अॅट्रोसिटि,महिला संरक्षण कायद्या आड दुरूपयोग वाढत आहेत ना?
भट किंवा भटजी व ब्राम्हण यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे.सर्व भटजी हे ब्राम्हण असतात पण सर्व ब्राम्हण भटजी नसतात भटगीरी करणाऱ्यांचे अत्यल्प आहे आणि ते स्वतः कोणाकडे जाऊन आमच्याकडून पूजापाठ, कर्मकांड करून घ्या म्हणून कोणाच्या मागे लागत नाहीत तर ज्यांना वाटत असते की त्याच्याकडून पूजापाठ,कर्मकांड करून घेतल्यानंतरच देवापर्यंत पूजा पोहचते किंवा सफल होते अश्या मानसिकतेची माणसं त्यांच्याकडे स्वतः जात असतात.आजही भटजींना येथेच्छ शिव्याशाप देणारे घरातील मुलांच्या जन्मापासून,लग्न,सणवार,मृत्युनंतरच्या क्रियाक्रमासाठी भटजीच्या घराचे उंबरठे झिजवत असतात किती हा विरोधाभास !
भटगीरी हि उदारनिर्वाहचे साधन असल्याने साहजिकच आजकालच्या व्यवसायशी निगडीत अवगुण त्याला पण चिकटले.सध्याचे ताजे उदाहरण घ्या शेतकरी आत्महत्याबद्दल सर्व समाज हळहळ व्यक्त करतोय पण हेच शेतकरी आरोग्याला घातक किटनाशकांचा वापर करतात.व तो निकृष्ट माल येथे विकतो व किटकनाशकाचा वापर न केलेला माल परदेशी पाठवतो.कधी शेतीमालाला योग्य भाव नाही भेटला की तो गोरगरीब लोकांना, अनाथाश्रम वगैरे न देता त्याची रस्त्यावर विल्हेवाट लावतातच ना ? बाजारात एखाद्या शेतीमालाचे भाव गगनाला भिडलेले असताना तो कधी गावातील भमिहीनाला व्यापार्‍याला देण्याच्या किंमतीत आपला माल विकतो का ? प्रत्येक गोष्टीसारखा ह्याला पण अपवाद असणारच फक्त अपवाद! इथं शेतकरी वर्गाला नाव ठेवायच नाही तर मानवीवृत्ती फक्त दाखवायची आहे इतकेच कारण पूर्वी सर्व ब्राम्हण गरीब म्हणायची पध्दत होती तशी आता सर्व शेतकरी गरीब म्हणायची रूढ होत आहे म्हणून...
अजून एक भारी बढाई मारल्या जातात कि मराठा किंवा क्षत्रिय लोक.. राजा लोक यांच्या सैन्यात महार, दलित सैनिक होते. याचा अर्थ राजे लोक सेक्युलर होते म्हणे !!
सेक्युलर होते तर कुठल्या राजानी स्वतःची मुलगी... राजकन्या कुठल्या बहुजन समाजातील मुलाला लग्न करून दिल्याची घटना तर ऐकिवात नाही. कुठल्या राजपुत्राने एखाद्या बहुजनसमाजातील कन्येशी विवाह केल्याचं मी कधीच वाचलं नाही. कुणबी, बलुतेदार, अठरापगड दलिताशी लग्न करून का दिलं नाही?
सवर्णांबरोबरच बहुजन सैन्य तर बाजीराव पेशव्यांच्या सैन्यातही होतं. किंवा तेच जास्त होते. तरीपण त्यांना मात्र भट, ब्राह्मणशाहीवाले वगैरे म्हणता तुम्ही.
तेव्हाचं जाऊ द्या. इतिहास बाजूला ठेवू थोडा वेळ.
केवळ ब्राह्मणांना जातीयवादी ठरवणाऱ्या आजच्या बहुसंख्य 'मराठा-बहुजन भाई भाई' वाल्या संघटनांना मी आजपर्यंत मराठा,बहुजन ( कुणबी) विवाह कार्यक्रम, 96 कुळी- 92 कुळी विवाह मेळावे भरवताना कधी पाहिलं नाही. बलुतेदार, अठरापगड मराठा समाज तर लांबच राहिला.
ऑनर किलिंगच्या घटना एकदा तपासून पहा. तुम्हाला कळेल जातीयवादी कोण आहेत ?
बरं ब्राह्मणांनी जाती व्यवस्था निर्माण केली, त्यांनी या लोकांना दलित, शुद्र बनवलं या थापांवर देखील माझा विश्वास नाही.
ब्राह्मणानं सांगितलं आणि तुम्ही केलं असं झालं का हो ?
तो सांगणारा मूर्ख होता. पण तुम्ही त्याचं ऐकून अनुसरण करणारे हुशार म्हणावेत कि बालिश ?
इनोसंट होते का तुम्ही लोक ?
काहीच कळत नव्हतं कि काय तुम्हाला ?
राजाश्रयाने जगण्याचा काळ संपताच ब्राम्हण समाजाने भटगीरी कमी करून वॆदिक शिक्षणाऎवजी व्यवहारीक शिक्षण घेऊन पुन्हा आपले बस्तान बसवले यातून बोध घ्यायला हवा.उगीच त्यांच्या नावाने फालतू बरळण्याऐवजी उर्वरीत समाजाने स्वतःला सुशिक्षित, सक्षम करून स्वकर्तृत्वाने मोठे व्हावे भूतकाळातील रुदन सोडून वर्तमान घडवण्याचा प्रयत्न करायला हवा .....
ही काही ब्राम्हण व्यक्तींची नावे पहा.
छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधानांमधील सात जण ,बाजीप्रभु देशपांडे , बाजीराव पेशवे आणि ईतर , वासुदेव बळवंत फडके, टिळक , सावरकर , चाफेकर , अनंत कान्हेरे , अरुणकुमार वैद्य ,झांशीची राणी ,संत ज्ञानेश्वर
बाळाजी विश्वनाथ , बाजीराव पेशवे, चिमाजी आप्पा पेशवे
सदाशिवराव पेशवे , विश्वासराव पेशवे, नानासाहेब पेशवे
माधवराव पेशवे, राघोबादादा पेशवे, सखारामबापू बोकील
नाना फडणवीस, सरदार पटवर्धन, सरदार पुरंदरे
सरदार मेहेंदळे, सरदार नातू , सरदार खासगीवाले,
वासुदेव बळवंत फडके,न्यायमूर्ती रानडे ,
आण्णासाहेब पटवर्धन,बाळ गंगाधर टिळक
गोपाळराव आगरकर, चाफेकर (बंधू ),शिवराम राजगुरू
अनंत कान्हेरे,हाॅटसन गोगटे, नामदार गोखले,सेनापती बापट
विनायक दामोदर सावरकर, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे
रॅगलर परांजपे,बाबा आमटे, साने गुरुजी,एस. एेम जोशी
दादासाहेब फाळके,आचार्य अत्रे,बाबासाहेब पुरंदरे
गो.नि. दांडेकर, नानासाहेब गोरे, नरेंद्र दाभोलकर
सुनील गावसकर ,सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर
रामदास स्वामी, र. धों. कर्वे, केळकर, कालेलकर
आचार्य धर्माधिकारी, रॅंग्लर नारळीकर, लोकहितवादी
अहिताग्नि राजवाडे, सरदार तुळशीबागवाले,
स्वामी रामानंद तीर्थ, डाॅ मुंजे, मृणाल गोरे,
अहिल्याताई रांगणेकर, अनुताई वाघ, दुर्गाबाई भागवत
मेघाताई पाटकर, डाॅ प्रकाश आमटे,इतिहासाचार्य राजवाडे
ज्ञानकोशकार केतकर वगैरे. पण सर्वसामान्य माणसाला मात्र मुद्दाम दोनच नाव वारंवार ऎकवली, सांगितली जातात. एक तो कृष्णाजी व दुसरा गोडसे असे का? कोणत्या समाजात दुर्गुणी माणसं नसतात? धर्मांध अतंकवाद्यांना धर्म नसतो पण भेकड गोडसेला मात्र जात असते!
हिंदू म्हणून एकजूट होऊन झाले गेल त्याला मूठमाती द्यावी. नाहीतर शॆकडो वर्षे गुलामगिरीत राहून आपण काहीच शिकलो नाही असेच खेदानं म्हणावे लागेल...
एकदा यावर विचार करा.
पटले तर घ्या नाहीतर आमचे पूर्वज किती असाह्य होते याच्या रडकथा सांगत रडत बसा...

Comments

Popular posts from this blog

How to wear tulasi (Kanti) mala

वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू

Advaita and ISKCON